Friday 8 July 2011

वेळ वाईट लागली !!

संपले अवघे उत्सव आणि गर्दी पांगली
पालखी आता जिण्याची, बघ रिकामी चालली

ऊन्ह आले मावळू आणिक या दुनियेपरी
माझियापासून पळते लांब माझी सावली

एवढी वाटे हवीशी ऊब अज्ञानातली
शक्यतांची शक्यताही मग नकोशी वाटली !

कोण हे म्हणते कधि जमली मज सौदागिरी
अक्षरांतुन वेदना विक्रीस आहे काढली !

दूषणे कोणास द्यावी अन् कशासाठी इथे ?
माणसे होती भली रे...वेळ वाईट लागली !!

संदीप खरे

No comments:

Post a Comment