Friday 8 March 2013

एकदा


एकदा पहिल्या पन्नासातच
पन्नास हजार विद्यार्थी आले
मग तपासाणारे म्हणाले
आता १०१ टक्के, १०२ टक्के, १०३ टक्के
असे मार्क देउ या !


नंतर नंतर व्हावचरं बनवणारे,
कॉरस्पॉन्डन्स करणारे लोक
शहरात राहू लागले
आणि कुळीथ, तूर, उडीद, बाजरी
पिकविणारे येडे खेड्यातच राहिले
खेड्यात गहू पिकतो
शहरात व्हावचरे पिकतात
कागदाचे भाव मात्र वाढतच राहीले
एके दिवशी मोठ्ठा  पाऊस आला
सगळे कागद ओले झाले
पण कागदांना मोड आले नाहीत

शेवटी गणोबाने परवा
रस्त्यात थांबवून दोन प्रश्न विचारले
१) परवा तुम्ही इतिहासात त्यांचे नाव
अजरामर होईल म्हणालात, त्यांचे नाव काय होते?
२) भारताला पारतंत्र्य किती साली मिळाले?


- अशोक नायगांवकर

No comments:

Post a Comment