Showing posts with label अशोक नायगांवकर. Show all posts
Showing posts with label अशोक नायगांवकर. Show all posts

Monday, 22 July 2013

स्टेट

शासकांनी
खोबरेल तेलाचे न्याय वाटप व्हावे म्हणून
सेक्टर सेक्टरमध्ये केंद्रे काढली
दर दिवशी प्रत्येकाने आपले डोके पुढे करायचे
आणि टाळूवर तेल चोपडून घ्यायचे
प्रतिभावंताने
आपले डोके असे खोबरेल तेलासाठी वाकवायचे
म्हणून ठाम नकार दिला,
खंबीर भूमिका घेतली:
खोबरेल तेल ही स्वायत्त वस्तू असून
कलावंताला त्याच्या इच्छेप्रमाणे
कोणापुढेही न वाकता
डोक्यास तेल चोपडण्याचा
जन्मसिद्ध अधिकार आहे!

शासनही खंबीर होते, ठाम होते
त्याच्या दृष्टीने सामान्यांच्या हितासाठी
काही कटू निर्णय घ्यावेच लागतात
शेवटी प्रतिभावंताने देश सोडला,
सोडचिट्ठी दिली,
परकी नागरिकत्व स्वीकारले,
तेथे त्याने सुरुवातीला छळाच्या कहाण्या सांगितल्या

पापड मोडला म्हणून फाशी
भर रस्त्यात चिथावले म्हणून फाशी
कवितेचा कट केला म्हणून फाशी
आणखीन काय काय बांधवांच्या कणवेपोटी!
शेवटी त्यालाही लोक कंटाळले,
बेचव कहाण्यांना
त्यांना छळाच्या ताज्या कहाण्या हव्या होत्या
आणि तेही कंटाळला
स्वातंत्र्याला
मुक्ततेला
अनिर्बंधतेला
मातीला आपल्या हाडांची ओढ अटळ असते
हे त्यालाही आतून नाकारता आले नाही

आता त्याच्यापुढे
गहन प्रश्न उभा राहिला
धोतर नेसले तर हवेत उडते,
सैरभैर होते
घट्ट वस्त्र घातले
तर घुसमटते, जीव गुदमरतो

अशोक नायगावकर

Friday, 8 March 2013

एकदा


एकदा पहिल्या पन्नासातच
पन्नास हजार विद्यार्थी आले
मग तपासाणारे म्हणाले
आता १०१ टक्के, १०२ टक्के, १०३ टक्के
असे मार्क देउ या !


नंतर नंतर व्हावचरं बनवणारे,
कॉरस्पॉन्डन्स करणारे लोक
शहरात राहू लागले
आणि कुळीथ, तूर, उडीद, बाजरी
पिकविणारे येडे खेड्यातच राहिले
खेड्यात गहू पिकतो
शहरात व्हावचरे पिकतात
कागदाचे भाव मात्र वाढतच राहीले
एके दिवशी मोठ्ठा  पाऊस आला
सगळे कागद ओले झाले
पण कागदांना मोड आले नाहीत

शेवटी गणोबाने परवा
रस्त्यात थांबवून दोन प्रश्न विचारले
१) परवा तुम्ही इतिहासात त्यांचे नाव
अजरामर होईल म्हणालात, त्यांचे नाव काय होते?
२) भारताला पारतंत्र्य किती साली मिळाले?


- अशोक नायगांवकर

Sunday, 2 December 2012

भाज्या


गळ्याशी नख खुपसून, अंदाज घेत क्रूर पणे त्वचा सोलली जातीये दुधी भोपळ्याची,
सपासप सुरी चालवत कांद्याची कापा काप चालली आहे, डोळ्याची आग आग होतीये,
शहल्या नारळावर कोयत्या ने दरोडा घातला आहे,
हे भाजला जात आहे वंग, निथाल्त्या त्वचेतून पाणी, टप टप,
तड ताडल्या मोहोरी, हा खेळ चा फड फडात,
कडीपत्या च्या पंखांचा उकड्त्या तेलात,
आणि तिखट टाकला जात आहे, भाजीच्या अंगावर डोळ्यात,
धारेवर खिसली जात आहे गजर,
पिळवणूक चालली आहे आंब्याची, सर्व हारा बनलीये कोय,
वर्वान्त्या खाली चिरडली जाते आहे मीठ मिरची,
बत्ता घातला जातो आहे वेलदोड्याच्या डोक्यात,
फडक्याने गळा ओढून मुसक्या बांधून दह्याला फासावर चाडवला आहे चक्का बनवण्यासाठी,
हे भरडले जाताहेत गहू, लाही लाही होतीये मक्याची ज्वारीची,
भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडा च्या पोटात,
पोलीस नुसतेच बघतायत,
संत्र्या मोसंबी केळ्यांची वस्त्र उतरवली जातायत,
हे काय चाललायं, हे काय चाललायं….

- अशोक नायगांवकर

Sunday, 7 October 2012

मी म्हणालो बायकोला

मी म्हणालो बायकोला, आजपासून प्रेयसी तू
ती म्हणाली, यापुढे चोरून भेटू

मी किनार्‍याचा तिला पत्ता दिला
ती बिचारी खरकटी उरकून आली

मी तिला फेसाळ लाटा दाखविल्या
ती म्हणाली, दूध हे जाते उतू

ती म्हणाली आठवा वर्षे जुनी
मी म्हणालो, काळ सारा गोठला

रूम मित्राने दिली एकांत रात्री
ती म्हणाली राहिली पोरे उपाशी

परतलो मग शेवटी आपल्या घराला
ती म्हणाली, कोणती भाजी डब्याला ?

- अशोक नायगांवकर